उद्या कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जो महाराष्ट्र शासनानं "मराठी भाषा दिन" म्हणून पाळायचा ठरवला तर जागतिक मराठी अकादमीनं त्याला "जागतिक मराठी भाषा दिवस" म्हटलं.. थोडक्यात काय तर उद्याचा दिवस आपल्या मायमराठी चा दिवस..
आपली संस्कृती विविधतेच्या घुसळणीतून निर्माण झाली आहे.. तशीच आपली मायमराठी भाषा.. एक विवाद असा आहे की पूर्वी "महाराष्ट्री" नावाची भाषा होती. त्या भाषेवरून नाव पडलं "महाराष्ट्र".. ही "महाराष्ट्री" संस्कृतमधून आली नसून तिची आई किंवा मावशी "प्राकृत" भाषा असावी असं अभ्यासक मानतात..
"महाराष्ट्र" हा शब्द पहिल्यांदा २६०० वर्षांपूर्वी नंदाचे राज्य मगध देशात असताना वररूची नावाच्या माणसानं लिहिलेला सापडतो. त्यानं "प्राकृतप्रकाश" नावाचं प्राकृताचं व्याकरण लिहिलं. त्या सूत्राचं शेवटचं प्रकरण "शेषं महाराष्ट्रीव्रत".. तो पहिला उल्लेख.
माणूस म्हणजे भाषा - भाषा आहे म्हणून माणूस आहे. म्हणून मी म्हणजे मराठी. माझी ओळख मराठी.. मराठी आहे म्हणून मी आहे. माझं अस्तित्वच मराठी आहे. जसं माझी आई असते म्हणून मी असतो, तसं मराठी भाषा आहे म्हणून मी आहे. म्हणूनच मी तिला मायमराठी म्हणतो. माझी आई, मराठीयाई.
ई. एम. सियोरान नावाच्या विचारवंताचं वाक्य खूप छान आहे, त्यानी म्हटलं आहे - "One does not inhabit a country; one inhabits a language." म्हणजे, माणूस कुठल्या देशाचा नसतो, तर तो एका भाषेचा असतो. उद्या मराठी भाषा दिवस. माझा अभिमान दिवस..
मराठी भाषेच्या १७-१८ बोली आणि ५२ इतर भाषा आहेत. ही आहे मराठीची श्रीमंती. विविधता. संस्कृतीचं असं असतं की जितकी संस्कृती महान तितकी विविधता मोठी... त्यामुळे मराठीचा जयजयकार करताना ह्या सर्व बोली आणि सहभाषाही जपल्या पाहिजेत, मोठ्या केल्या पाहिजेत.
मध्यप्रदेशात सागर नावाचा जिल्हा आहे. तिथल्या एरण नावाच्या गावात इसवीसन ३६५ ला एक शिलालेख लिहिला गेला. तिथला राजा श्रीधरवर्मा, त्याचा सेनापती सत्यनाग, त्यानं ह्या शिलालेखात “महाराष्ट्र” असा उल्लेख केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथे रहाणारा श्रीपती ह्यानं इसवीसन ९९९ ते १०५० ह्या काळात कधीतरी पहिलं मराठी पुस्तक लिहिलं. ज्योतिषरत्नमाला ह्या नावाचं. ह्याला पुस्तक मानायचं की नाही ह्याबाबत संशोधकात थोडे मतभेद आहेत.. पण लेखन आहे इतकं जुनं..
मराठी भाषेची श्रीमंती पहा.. नवव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या कर्पूरमंजरी नावाच्या एका नाटकात “महाराष्ट्री” भाषा आहे.. ती भाषा, जिच्यावरून “महाराष्ट्र” म्हणतात. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात यशच्चंद्र नावाच्या जैन ग्रंथकारानं संस्कृत नाटकात मराठी भाषेचा उपयोग केला आहे.
लोकभाषातून प्राकृत निर्माण झाली. संस्कृत फक्त विशिष्ट गटापुरती राहिली. तीत ग्रंथ निर्माण झाले.. पण प्राकृत विकसित होत गेली. त्या भाषेतून मागधी, अर्धमागधी, पैशाची, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा भाषा झाल्या.. गौतम बुध्दांनी प्राकृतास धर्मप्रसाराची भाषा ठरवली.
मराठी साहित्याचा विचार केला तर ११८८ ला विवेकसिंधू, १२७८ ला लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी १२९०.. किती महान साहित्यपरंपरा… त्यामुळे मराठी माणसांनी नुसती तलवार गाजवली नाही. मराठी ज्ञानभाषा, विचारभाषा, व्यवहारभाषा, लोकभाषा, व्यापारभाषा, राज्यकारभारभाषा झाली. विकसित होत गेली.. अशीच ती विकसित होत जावो..
आपली संस्कृती विविधतेच्या घुसळणीतून निर्माण झाली आहे.. तशीच आपली मायमराठी भाषा.. एक विवाद असा आहे की पूर्वी "महाराष्ट्री" नावाची भाषा होती. त्या भाषेवरून नाव पडलं "महाराष्ट्र".. ही "महाराष्ट्री" संस्कृतमधून आली नसून तिची आई किंवा मावशी "प्राकृत" भाषा असावी असं अभ्यासक मानतात..
"महाराष्ट्र" हा शब्द पहिल्यांदा २६०० वर्षांपूर्वी नंदाचे राज्य मगध देशात असताना वररूची नावाच्या माणसानं लिहिलेला सापडतो. त्यानं "प्राकृतप्रकाश" नावाचं प्राकृताचं व्याकरण लिहिलं. त्या सूत्राचं शेवटचं प्रकरण "शेषं महाराष्ट्रीव्रत".. तो पहिला उल्लेख.
माणूस म्हणजे भाषा - भाषा आहे म्हणून माणूस आहे. म्हणून मी म्हणजे मराठी. माझी ओळख मराठी.. मराठी आहे म्हणून मी आहे. माझं अस्तित्वच मराठी आहे. जसं माझी आई असते म्हणून मी असतो, तसं मराठी भाषा आहे म्हणून मी आहे. म्हणूनच मी तिला मायमराठी म्हणतो. माझी आई, मराठीयाई.
ई. एम. सियोरान नावाच्या विचारवंताचं वाक्य खूप छान आहे, त्यानी म्हटलं आहे - "One does not inhabit a country; one inhabits a language." म्हणजे, माणूस कुठल्या देशाचा नसतो, तर तो एका भाषेचा असतो. उद्या मराठी भाषा दिवस. माझा अभिमान दिवस..
मराठी भाषेच्या १७-१८ बोली आणि ५२ इतर भाषा आहेत. ही आहे मराठीची श्रीमंती. विविधता. संस्कृतीचं असं असतं की जितकी संस्कृती महान तितकी विविधता मोठी... त्यामुळे मराठीचा जयजयकार करताना ह्या सर्व बोली आणि सहभाषाही जपल्या पाहिजेत, मोठ्या केल्या पाहिजेत.
मध्यप्रदेशात सागर नावाचा जिल्हा आहे. तिथल्या एरण नावाच्या गावात इसवीसन ३६५ ला एक शिलालेख लिहिला गेला. तिथला राजा श्रीधरवर्मा, त्याचा सेनापती सत्यनाग, त्यानं ह्या शिलालेखात “महाराष्ट्र” असा उल्लेख केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथे रहाणारा श्रीपती ह्यानं इसवीसन ९९९ ते १०५० ह्या काळात कधीतरी पहिलं मराठी पुस्तक लिहिलं. ज्योतिषरत्नमाला ह्या नावाचं. ह्याला पुस्तक मानायचं की नाही ह्याबाबत संशोधकात थोडे मतभेद आहेत.. पण लेखन आहे इतकं जुनं..
मराठी भाषेची श्रीमंती पहा.. नवव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या कर्पूरमंजरी नावाच्या एका नाटकात “महाराष्ट्री” भाषा आहे.. ती भाषा, जिच्यावरून “महाराष्ट्र” म्हणतात. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात यशच्चंद्र नावाच्या जैन ग्रंथकारानं संस्कृत नाटकात मराठी भाषेचा उपयोग केला आहे.
लोकभाषातून प्राकृत निर्माण झाली. संस्कृत फक्त विशिष्ट गटापुरती राहिली. तीत ग्रंथ निर्माण झाले.. पण प्राकृत विकसित होत गेली. त्या भाषेतून मागधी, अर्धमागधी, पैशाची, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा भाषा झाल्या.. गौतम बुध्दांनी प्राकृतास धर्मप्रसाराची भाषा ठरवली.
मराठी साहित्याचा विचार केला तर ११८८ ला विवेकसिंधू, १२७८ ला लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी १२९०.. किती महान साहित्यपरंपरा… त्यामुळे मराठी माणसांनी नुसती तलवार गाजवली नाही. मराठी ज्ञानभाषा, विचारभाषा, व्यवहारभाषा, लोकभाषा, व्यापारभाषा, राज्यकारभारभाषा झाली. विकसित होत गेली.. अशीच ती विकसित होत जावो..
अनिल शिदोरे, २६ फेब्रुवारी २०२०